भारती विद्यापीठातर्फे 'पर्यावरण वाचवा' ची रॅली
भारती हॉस्पिटल न्यूज/सांगली (रोहित रोकडे)
येथील भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या विद्यार्थ्यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'वृक्षतोड टाळा-पर्यावरण वाचवा' ची रॅली काढण्यात आली. भारती विद्यापीठ कॅम्पस ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मार्ग होता. नूतन अधिष्ठाता डॉ.नितीन मुदीराज यांनी याचे संयोजन केले. रॅलीत तब्बल एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, आयुक्त सत्यम गांधी, उपायुक्त स्मृती पाटील यांनी या रॅलीस पाठिंबा दिला.
नर्सिंग प्राचार्य डॉ.सुरेशकुमार रे, डेंटल प्राचार्य डॉ.शरद कामत, फिजिओथेरपी प्राचार्या डॉ.स्नेहा कटके यांच्यासह सर्व शाखांचे प्रमुख उपस्थित होते.
यावर्षी 'प्लॅस्टिक प्रदूषणापासून मुक्ती' ही थीम होती. विद्यार्थ्यांनी रॅलीद्वारे आवाहन केले की, प्लॅस्टिक टाळा-पर्यावरण वाचवा, प्लॅस्टिकचा वापर टाळून या अभियानाला साथ द्यावी. वनसंपदा जपण्याचे आवाहन केले.
पार्श्वनाथनगर येथे महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्याहस्ते ५० झाडांचे रोपण करण्यात आले. भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पार्श्वनाथनगर येथील नियोजित जागेत औषधी वनस्पतींची बाग तयार करण्याचा मानस असल्याचे डॉ.मुदीराज यांनी सांगितले.
उपाधिष्ठाता डॉ.अजित जोशी, डॉ.रामचंद्र लिमये, वैद्यकीय अधीक्षक डॉ.सारा धनवडे, शरीरविभाग प्रमुख डॉ.उत्तमा जोशी,स्टुंडट कौन्सिलच्या प्रमुख डॉ.प्रिया पाटील, अध्यक्ष राजनील पाटील व सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्यासाठी पर्यावरण गरजेचे असल्याचे डॉ.प्रिया पाटील यांनी सांगितले. निसर्गाशी मिळतंजुळतं असावं म्हणून विद्यार्थ्यांनी हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
आभार प्रा.सचिन सकटे यांनी मानले.
नर्सिंग महाविद्यालयातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या वाढीसाठी आणि एकूणच पर्यावरणावर प्रकाशझोत टाकण्यासाठी पथनाट्य सादर केले. प्राचार्य डॉ. सुरेशकुमार रे, अक्कमादेवी बेरगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण राखण्याचा संदेश त्यांनी दिला.
आ.डॉ.विश्वजीत कदम यांच्या सहकार्याने भारती विद्यापीठ कॅम्पस हिरवागार आहे. स्व.डॉ.एच.एम.कदम यांनी येथील झाडांवर विशेष लक्ष दिले होते. पर्यावरणपूरक कॅम्पस असल्याने एक वेगळीच ऊर्जा येते.